sakshi aahuja delhi

महिलेने पाण्यापासून वाचण्यासाठी खांब पकडला अन् एका क्षणात…

देश

नवी दिल्लीः राजधानी दिल्लीसह देशाच्या विविध भागात पाऊस पडत आहे. पावसामुळे नवी दिल्लीत अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. यामुळे एका महिलेला जीव गमवावा लागला आहे.

साक्षी आहुजा नावाची महिला पहाटे साडेपाच वाजता नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचली होती. तिच्यासोबत 2 महिला आणि 3 मुले होती. साक्षीला चंदीगडला जायचे होते. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत आहे, त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी साचले आहे. रेल्वे स्टेशन परिसरातही पाणी साचले होते. पाण्यापासून वाचण्यासाठी महिलेने विजेचा खांब पकडला आणि जोराचा धक्का बसला. तिला तातडीने रुग्णालयात नेले असता तिचा मृत्यू झाला.

साक्षीच्या मृत्यूमुळे तिची दोन मुले अनाथ झाली आहेत. या घटनेनंतर कुटुंबीयांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या अपघाताला रेल्वे जबाबदार असल्याचा साक्षीच्या वडिलांचा आरोप आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.